INFO Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अध्यात्मिक आपला पाल्य अभिमन्यू होऊ नये ! ... तरच तो चक्रव्यूहात अडकणार नाही.

अध्यात्मिक आपला पाल्य अभिमन्यू होऊ नये ! ... तरच तो चक्रव्यूहात अडकणार नाही.


 

अर्जुनाचा आणि सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु.सुभद्रा गरोदर असताना भगवान श्रीकृष्णांनी तिला युद्धात चक्रव्यूह कसं भेदायचं हे तंत्र सांगत असताना तिला झोप लागली त्यामुळे चक्रव्यूहात जाण्यापर्यंतचा भागच तिने ऐकला.तिच्या पोटात असलेला गर्भ हे ऐकत होता.याला गर्भधान संस्कार म्हणतात.पुढे महाभारत युद्धात अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्यासाठी गेला पण बाहेर यायचं त्याला माहीत नसल्याने तो मारला गेला.सर्वात कमी वय असलेला हा योद्धा,युद्धात अत्यंत प्रारंगत असुनही मारला गेला.पुढचे योद्धे अनितीने वागतील याची त्याने कल्पना केलीच नव्हती.
$ads={1}
आम्ही अभिमन्यूला अर्जुनाचा पुत्र समजलो तर ते केवळ एक कथानक ठरेल.आमच्या मुलात आम्ही अभिमन्यू पाहिला तर तो चक्रव्यूहात अडकणार नाही याची तजबीज वेळीच करता येईल.
सज्जनहो मुलं पुस्तकी किडा होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.
त्याला लोकव्यवहारज्ञान देणे,सत असत ज्ञान देणे, ही आईवडिलांची जबाबदारी आहे. त्याला समाजात कसं वागावं हे कळणं म्हणजे चक्रव्यूहात प्रवेशुन यशस्वीपणे बाहेर येणे आहे. हे जमले नाही तर लोक काय म्हणतील?या व्यर्थ विचाराने तो संसार चक्रव्यूहात फसणार आहे.
$ads={2}
अभिमन्यु चक्रव्यूहात फसला तेव्हा वडिलच काय पण प्रत्यक्ष युद्धभुमीवर भगवंत उपस्थित असताना ते सुद्धा त्याला वाचवु शकले नाही.त्याही अगोदर हे लक्षात घ्या की अभिमन्युला चक्रव्युहातुन बाहेर येण्याचे ज्ञान नाही हे स्वतः भगवान श्रीकृष्ण जाणत होते.आपणही आपल्या मुलांचे एखाद्या विषयातले कमीपण जाणत असतो.ते दुर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचं भविष्य घडवताना आपल्या हट्टापायी त्याचा अभिमन्यु होणार नाही याची दक्षता पालकांनी घ्यायलाच हवी.त्याच्या भविष्याची सुरुवात गर्भधान संस्काराने होते हे समजले तरी खूप काही चांगले घडेल.

0 Comments:

Responsive

Ads

Here